खालापूर ः प्रतिनिधीपावसाच्या संततधारेमुळे पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ आली आहे, तर खालापूर तालुक्यातील डोणवत धरण ओव्हरफ्लो झाल्याने भिलवले, आडोशी अशी तिन्ही धरणे 100 टक्के भरल्याची माहिती कनिष्ठ अभियंता चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील खालापुरातील भिलवले धरण 5 जुलैला, तर कलोते मोकाशी येथील धरण 24 जुलैला व गुरुवारी डोणवत धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धामणी येथील वळण बंधारा पूर्वीच भरल्याने खालापूर तालुक्यातील तिन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे पुढील काळात भेडसावणारी पाणी समस्या सुटली आहे.
Check Also
पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‘जीवन गौरव’ प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्तजनसेवेच्या महान यज्ञामध्ये उल्लेखनीय योगदान देत भावी पिढीला प्रेरणा देणारे माजी खासदार, …
RamPrahar – The Panvel Daily Paper