खालापूर ः प्रतिनिधीपावसाच्या संततधारेमुळे पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ आली आहे, तर खालापूर तालुक्यातील डोणवत धरण ओव्हरफ्लो झाल्याने भिलवले, आडोशी अशी तिन्ही धरणे 100 टक्के भरल्याची माहिती कनिष्ठ अभियंता चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील खालापुरातील भिलवले धरण 5 जुलैला, तर कलोते मोकाशी येथील धरण 24 जुलैला व गुरुवारी डोणवत धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धामणी येथील वळण बंधारा पूर्वीच भरल्याने खालापूर तालुक्यातील तिन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे पुढील काळात भेडसावणारी पाणी समस्या सुटली आहे.
Check Also
नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर
उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper