मुंबई : प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणार्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेने खूशखबर दिली आहे. कोकण रेल्वेमार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कोकणासाठी 82 अप आणि 82 डाऊन अशा एकूण 162 विशेष गाड्या धावणार आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि रत्नागिरी अशा या ट्रेन धावतील. 15 ऑगस्टपासून या ट्रेनचे बुकिंग सुरू होणार आहे. कन्फर्म तिकीट असणार्यांनाच या ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा असणार आहे. प्रवाशांनी कोरोनाशी संबंधित सर्व नियम पाळण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
Check Also
देशाचे प्रधानसेवक म्हणून नरेंद्र मोदी कार्यरत -मंत्री ॲड. आशिष शेलार
पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे प्रधानसेवक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. म्हणूनच जनतेचा त्यांच्यावर …
RamPrahar – The Panvel Daily Paper