मुंबई ः प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौरऊर्जा, इथेनॉल यांसारख्या क्षेत्रांत केलेले काम निश्चितच उल्लेखनीय आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे.
रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौरऊर्जा, इथेनॉलसारख्या क्षेत्रांत केलेले काम निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचे कौतुक करायलाच हवे. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असेच काम होईल असा विश्वास आहे.
याबरोबरच कोरोना हे दुसर्या महायुद्धानंतरचे जगापुढचे सर्वांत मोठे आव्हान असून, याविरोधात निर्णायक कृती करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदीजींनी जी-20 परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला, असे सांगून आमदार पवार यांनी राज्यातूनही तशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper