रायसेन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील रायसेन येथील शेतकरी संमेलनाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पुन्हा एकदा सुधारित कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले आहे. कृषी कायदे हे एका रात्रीत आलेले नाहीत, तर गेल्या 20 ते 22 वर्षांमध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने त्यावर व्यापक चर्चा केलेली आहे. आज देशातील सर्वच राजकीय पक्षांचे जुने जाहीरनामे बघितले, त्यांची जुनी भाषणे ऐकली, जे कृषी मंत्रालय सांभाळत होते त्यांची पत्रे वाचली तर आज कृषी क्षेत्रात जे बदल करण्यात आले आहेत ते वेगळे नाहीत. आमचे सरकार शेतकरी समर्पित असून, आम्ही फायलींच्या ढिगार्यात फेकण्यात आलेल्या स्वामीनाथन आयोगाचा अहवाल बाहेर काढला आणि शिफारशी लागू केल्या, पण आज मोदी हे सगळे लागू करीत असल्याने विरोधकांना पोटदुखी होतेय, असा निशाणा पंतप्रधानांनी साधला.
Check Also
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन
विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …
RamPrahar – The Panvel Daily Paper