मुंबई : प्रतिनिधी
राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या छायेखाली आहे.
महाराष्ट्रात 5 ते 11 फेब्रुवारीदरम्यान पावसाळी वातावरण असेल. उत्तरेकडील पट्ट्यात आणि दक्षिण टोकाला काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. पाऊस पडला आंबा, काजूसह भाजीपाला आणि इतर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper