अहमदनगर : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत उपोषणाला बसणार्या ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी केंद्रीय मंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे उपोषण स्थगित केले आहे. केंद्र सरकारने सुचविलेल्या उपायांबाबत आपण समाधानी असल्याचेही ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, पण शिवसेनेक़डून मात्र अण्णांच्या या सहकार्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यावर अण्णा हजारे यांनी कोणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज व देशाला प्राधान्य देतो अशी भूमिका मांडली. तसेच तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला व तुम्ही तो कसा पाठीशी घातला याबाबतची सगळी माहितीच देईन, असा इशाराच अण्णांनी शिवसेनेला दिला आहे.
Check Also
पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper