माणगाव : प्रतिनिधी
ठाणे येथील युवा भारत सामाजिक संघटनेमार्फत महाड परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना गुरुवारी (दि. 5) जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.
संघटनेचे युवा सदस्य सागर पाटील, सुरेश मोरे, किशोर गुंडवार व त्यांच्या सहकार्यांनी महाड तालुक्यातील पूरग्रस्त गावांत जाऊन तेथील ग्रामस्थांना किराणा सामान, गव्हाचे पीठ, डाळ, तांदूळ, साखर, चहा पावडर, साबण, बिस्कीट पुडे, सॅनिटरी पॅड, ब्लँकेट्स, टुथपेस्ट आदी वस्तू असलेल्या एकूण दोन हजार किलो वजनाच्या पाचशे किटचे वाटप केले. या मदतीबद्दल आपद्ग्रस्त ग्रामस्थांनी संघटनेचे आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper