टोकियो ः भारतीय नेमबाज अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय भारताच्या योगेश कथुरियाने पुरुषांच्या थाळीफेकमध्ये रौप्यपदक पटकाविले. दोन वेळचा सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझारियाने या वेळी भालाफेकमध्ये रौप्यपदकावर मोहोर उमटवली, तर सुंदरसिंग गुर्जरही कांस्यपदक मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या सातवर पोहचली. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये यश मिळविणार्या विजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे भारताचा थाळीफेकपटू विनोद कुमारचे कांस्यपदक काढून घेण्यात आले आहे.
Check Also
लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…
काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …
RamPrahar – The Panvel Daily Paper