मुंबई ः प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनला 25 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आर्यनच्या जामिनासाठी शाहरूखची मैत्रीण व अभिनेत्री जुही चावला ही जामीनदार म्हणून राहिली आहे. एक लाखांच्या जातमुचलक्यावर आर्यची जामिनावर सुटका झाली.
आर्यनच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने 14 अटी घातल्या आहेत. आर्यन हा पोलिसांना कळवल्याशिवाय मुंबई सोडू शकणार नाही. त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याला त्याचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी ‘रयत’तर्फे हृद्य सत्कार
संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper