अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमध्ये मंगळवारी (दि. 21) शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. 234 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून मतमोजणी 19 जानेवारी रोजी केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना निकालासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रायगड जिल्ह्यात माणगाव, म्हसळा, तळा, पोलादपूर, पाली व खालापूर या सहा नगरपंचायतींमधील एकूण 79 जागांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. सर्व नगरपंचायतींमध्ये मतदारांनी शांततेत मतदान क्केले. सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.83 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले. याची मतमोजणी व निकाल बुधवारी (दि. 22) आहे.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper