Breaking News

मुंबईत पहिली ते आठवीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद

मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनासोबतच ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अशातच ओमायक्रॉनचेही रूग्ण वाढू लागले आहेत. वाढत्या फैलावामुळे मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, नववी ते बारावीच्या शाळा आणि महाविद्यालये लसीकरणासाठी खुली ठेवण्यात येतील, असे आयुक्त चहल यांनी सांगितले.

Check Also

पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‌‘जीवन गौरव‌’ प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तजनसेवेच्या महान यज्ञामध्ये उल्लेखनीय योगदान देत भावी पिढीला प्रेरणा देणारे माजी खासदार, …

Leave a Reply