Breaking News

वणव्यांमुळे सुधागड तालुक्यातील वनसंपदा, पशू-पक्षी होताहेत नष्ट ऐतिहासिक वारसेदेखील धोक्यात

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील डोंगरांना लागणार्‍या वणव्यांमध्ये झाडे-झुडपे, पशू-पक्षी, सु्क्ष्मजीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा होरपळून मृत्यू होत आहेत. सजीव सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. डोंगर-दर्‍यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा म्हणून रायगड जिल्हा ओळखला जातो. सुधागड तालुक्यातील किल्ले, गड, जंगल या ठिकाणी पावसाळ्यात मोठया प्रमाणात छोटी झुडपे व गवत उगवते. ऑक्टोंबरनंतर वाढत्या उष्म्याने ही झुडप व गवत सुकते आणि त्याला वणवा लागतो. या वणव्यांत  झाडे-झुडपे, पशू-पक्षी, सु्क्ष्मजीव तसेच सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. या वणव्यांवर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. पाली व सुधागड तालुक्यातील वणवे सजीवसृष्टी नष्ट करीत आहेत, वनविभागाने ही बाब गंभीरतेने घेवून तत्काळ उपायोजना करणे आवश्यक आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply