Breaking News

रायगडात पर्यटनवृद्धीसाठी अधिक सेवासुविधांची गरज

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

अलिबाग ः जिमाका 
रायगड जिल्ह्यात पर्यटनवृद्धीच्या अनेक संधी आहेत, मात्र पर्यटनवाढीसाठी अधिक सेवासुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. रायगड जिल्ह्याच्या नियोजन भवन येथे सोमवारी (दि. 3) राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा राज्यपालांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे आदी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, शिवभोजन, मुख्यमंत्री सोलर पंप योजना, अमृत आहार, माझी कन्या भाग्यश्री, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कातकरी अभियान, आयुष्यमान भारत यांसह केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन, बेटी बचाओ, बेटी पढाओ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अमृत योजना, ग्राम ज्योती योजना, प्रधानमंत्री आवास योजना, कौशल्य विकास योजना, मनरेगा आदी योजनांचा या वेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.
रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी एकाच वेळी किमान चार ते पाच हेलिकॉप्टर्स उतरले पाहिजेत अशा सुविधा करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे देशभरातील पर्यटक तेथे भेट देऊ शकतील. रायगड जिल्ह्याला सागरी, डोंगरी आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याचा उपयोग पर्यटनवृद्धीसाठी होणे आवश्यक आहे. जेथे पर्यटनाच्या अधिक संधी आहेत तेथे वाहतूक व्यवस्थेसोबतच अधिकाधिक अन्य सेवासुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शासकीय निधीचा 100 टक्के उपयोग झाल्यास अपेक्षित विकास होऊ शकतो, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply