नागोठणे : प्रतिनिधी : चौथा शनिवार, तसेच रविवार आणि त्याला लागूनच सोमवारी लोकसभेच्या मतदानानिमित्त जाहीर करण्यात आलेली सुटी, याचा महामार्गावर परिणाम साधला असून मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुलून गेला आहे. कोकणाच्या बाजूकडे जाणारी बहुतांशी चार चाकी वाहने मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, पनवेल, नवी मुंबईचीच असल्याचे या वाहनांच्या क्रमांकांवरून स्पष्ट होत आहे. या वाहनांबरोबर जादा खाजगी बसेससुद्धा भरून जात असल्याने मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुलून गेला आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper