Breaking News

मी जय श्रीराम म्हणणारच, हिंमत असेल तर ममतादीदींनी अटक करावी : शहा

जॉयनगर ः वृत्तसंस्था

बंगालमध्ये कुणीही जय श्रीराम म्हणायचे नाही, अशी सक्त ताकीद ममता बॅनर्जी यांनी दिली आहे, मात्र मी जय श्रीराम म्हणणारच. हिंमत असेल तर ममतादीदींनी मला अटक करून दाखवावी, असे थेट आव्हानच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना दिले आहे. अमित शहा यांच्या सभेला जावेदपूर या ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर काल जॉयनगर भागात अमित शहा यांनी प्रचारसभा घेतली. या सभेत अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.

बंगालमध्ये कुणीही जय श्रीरामचा नारा द्यायचा नाही, असे ममतादीदींनी बजावले आहे, मात्र मी जय श्रीरामचा नारा देऊन येथून कोलकात्याला जात आहे. हिंमत असेल तर ममता बॅनर्जी यांनी मला अटक करून दाखवावी, असे आव्हान अमित शहा यांनी ममतांना दिले. लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. यादरम्यान जॉयनगरमधील प्रचारसभेत अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली. माझ्यासोबत हात उंचवा आणि विजय संकल्प करा, असे म्हणत अमित शहा यांनी या वेळी जय श्रीरामचा बुलंद नारा दिला.

या वेळी अमित शहा यांच्यासोबत भाषणाला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनीही जय श्रीरामचा जयघोष केला. गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान अद्याप बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply