नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. आता याबाबतची सुनावणी 14 फेब्रुवारीला होईल, अशी माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यापासून हा ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष सर्वाच्च न्यायालयात पोहचला आहे. सत्तासंघर्षात मंगळवारी (दि. 10) काही निकाल येणार की फक्त घटनापीठ बदलले जाणार याची उत्सुकता होती, पण सुनावणी झाली नाही. आता ही सुनावणी 14 फेब्रुवारीपासून सलग घेतली जाणार आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …
RamPrahar – The Panvel Daily Paper