Breaking News

खालापुरात अळंबीतून पाच जणांना विषबाधा

खालापूर : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील आडोशी आदिवासीवाडीत अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच आदिवासींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

रघुनाथ नथू वाघमारे (40), ठमी रघुनाथ वाघमारे (35), गणेश रघुनाथ वाघमारे (15), अंकुश रघुनाथ वाघमारे (9) व ललिता रघुनाथ वाघमारे (7) अशी विषबाधा झालेल्या आदिवासींची नावे आहेत. त्यांना शनिवारी (दि. 20) रात्री अळंबीतून विषबाधा झाली. या सर्वांना तातडीने खोपोली पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply