Breaking News

शहिदांच्या वारसांना सरकारी नोकरी

मुंबई : प्रतिनिधी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 24) केली. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या अधिवेशनात 11 विधेयके पटलावर असून, 27 फेब्रुवारीला संक्षिप्त अर्थसंकल्प मांडला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply