Breaking News

प. महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43

पुणे : प्रतिनिधी

कोल्हापूर आणि सांगलीत आणखी तीन मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43वर पोहोचली असून, अद्यापही तीन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत चार लाख 74 हजार 226 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असून, पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने तातडीची पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रोख रक्कम उद्याच पूरग्रस्तांपर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर अखेर आठ दिवसांनंतर कोल्हापूर-शिरोली अशी अवजड वाहतूक सुरू करण्यात आली.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply