Breaking News

वनवासी आश्रमास साहित्यिकांची भेट

खोपोली : प्रतिनिधी

कर्जत जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमाला खोपोली येथील साहित्यिकांनी भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी हितगुज करीत खाऊ व पुस्तकांचे वाटप केले.

 र. वा. दिघे यांच्या स्नुषा कवियित्री उज्वला दिघे, नलिनी पाटील, सुधा इतराज व स्वाती जोशी या साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी कर्जत तालुक्यातील जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमास भेट देऊन आश्रमाच्या कामकाजाची माहिती घेतली. प्रारंभी वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्या ठमाबाई पवार यांनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील विद्यार्थ्यांनीही पाहुण्यांसमोर कविता व गाणी सादर केली. यावेळी साहित्यिकांनीही   स्वरचित कविता गाऊन सादर केल्या. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी खाऊ वाटप केले. व 50 पुस्तकांचा संच आश्रमास भेट म्हणून दिला. आश्रमातील कामकाजाबद्दल पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply