Breaking News

‘आयपीएलचे सामने रात्री आठलाच सुरू होणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाइंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या बाराव्या हंगामातील सामन्यांच्या वेळांबद्दलचा संभ्रम अखेरीस संपुष्टात आलेला आहे. 23 मार्चपासून रंगणारे आयपीएलचे सर्व सामने रात्री 8 वाजता सुरु होणार असल्याचे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिले. संध्याकाळचे सामने 4 वाजता; तर रात्रीचे सामने 8 वाजता सुरू होतील. मधल्या काही दिवसांमध्ये बीसीसीआय सामन्यांची वेळ 7 वाजता करणार असल्याची चर्चा होती. अकराव्या हंगामाच्या उत्तरार्धातही बीसीसीआयने काही सामन्यांची वेळ संध्याकाळी 7 वाजता ठेवली होती, मात्र काही संघमालकांचा या निर्णयाला विरोध होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी सामन्यांची वेळ रात्री 8 वाजताचीच ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply