Breaking News

निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

खोपोली ः प्रतिनिधी : कोरोनाविरोधात लढा तीव्र करण्यासाठी देशात लॉकडाऊन व राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यादरम्यान ज्यांचे हातावर पोट आहे व जी निराधार कुटुंबे आहेत त्या सर्वांना खोपोली पोलिसांनी पुढील 15 ते 20 दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करून मोठा दिलासा दिला आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने खोपोली पोलीस स्टेशन हद्दीतील अशा सर्व घटकांना शुक्रवारी (दि. 27) अन्यधान्याचे वाटप करण्यात आले.

उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर व अन्य सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांनी यासाठी पुढाकार घेतला. या वेळी उपअधीक्षक डॉ.  रणजित पाटील, वरिष्ठ निरीक्षक धनाजी क्षीरसागर, खोपोली पोलीस स्टेशनचे अन्य अधिकारी-कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी हे साहित्य वाटप केले.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply