राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना रुग्णालयातून घरी पाठविताना त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. इतर रुग्णांना घरी पाठविताना मात्र त्यांची पुन्हा चाचणी केली जात नाही. मग मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंसाठी वेगळा न्याय का, असा खडा सवाल माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी या वेळी उपस्थित केला.
मुंबई महानगर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रायगड जिल्ह्यातदेखील रुग्णसंख्या वाढली आहे. ग्रामीण भागात सातत्याने कोरोना रुग्ण आढळू लागले आहेत. पुढील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी येथील आरोग्य यंत्रणा सज्ज नाही. ज्या काही सुविधा आहेत त्या जुन्याच आहेत. त्या अपुर्या पडणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भविष्यात कोरोनामुळे हाहाःकार उडेल, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला.
Check Also
पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …
RamPrahar – The Panvel Daily Paper