
मोहोपाडा : प्रतिनिधी
24 जुलै 1989 रोजी पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामध्ये जीव गमावलेल्यांचा स्मृती स्तंभ कष्टकरीनगर येथे बांधण्यात आला आहे. दर वर्षी या स्तंभांची रंगरंगोटी करुन या स्तंभांची पुष्प हार व श्रीफळ अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येते. या वेळी तुराडे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड, पत्रकार गौतम सोनावणे, दादासो आटपाडकर, काका गायकवाड, सुनिल राठोड, भिमू राठोड, नजमा साखरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper