Breaking News

पाताळगंगा नदीच्या पुरात जीव गमावलेल्यांना भावपूर्ण आदरांजली

मोहोपाडा : प्रतिनिधी

24 जुलै 1989 रोजी पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामध्ये जीव गमावलेल्यांचा स्मृती स्तंभ कष्टकरीनगर येथे बांधण्यात आला आहे. दर वर्षी या स्तंभांची रंगरंगोटी करुन या स्तंभांची पुष्प हार व श्रीफळ अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येते. या वेळी तुराडे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड, पत्रकार गौतम सोनावणे, दादासो आटपाडकर, काका गायकवाड, सुनिल राठोड, भिमू राठोड, नजमा साखरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय …

Leave a Reply