मुंबई : राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या निर्बंधांबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. अखेर राज्य शासनाने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक-4संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधने शिथील झाली आहेत.
