Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

राज्यात 14,234 ठिकाणी 15 जानेवारीला मतदान

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात 34 जिल्ह्यांतील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान, तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी (दि. 11) येथे केली.
मदान यांनी सांगितले की, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या एक हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते, मात्र कोविड-19ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्चला हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020अखेर मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित होणार्‍या सर्व ग्रामपंचायतींसाठी नवा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.
निवडणूक होणार्‍या जिल्हानिहाय ग्रामपंचायती
ठाणे 158, पालघर 3, रायगड 88, रत्नागिरी 479, सिंधुदुर्ग 70, नाशिक 621, धुळे 218, जळगाव 783, अहमनगर 767, नंदुरबार 87, पुणे 748, सोलापूर 658, सातारा 879, सांगली 152, कोल्हापूर 433, औरंगाबाद 618, बीड 129, नांदेड 1015, उस्मानाबाद 428, परभणी 566, जालना 475, लातूर 408, हिंगोली 495, अमरावती 553, अकोला 225, यवतमाळ 980, वाशीम 163, बुलडाणा 527, नागपूर 130, वर्धा 50, चंद्रपूर 629, भंडारा 148, गोंदिया 189 आणि गडचिरोली 362. एकूण 14,234.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply