धाटाव : प्रतिनिधी
मुंबईहून रोह्यातील बाहे गावी आपल्या मित्राकडे आलेल्या दोन तरुणांचा कुंडलिका नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबईहून 25जण शनिवारी (दि. 20) बाहे गावी सहलीसाठी आले होते. त्यापैकी काही तरुणांना पोहोण्याचा मोह आवरला नाही, मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अजिंक्य जयराम साळवी) व प्रणव राजाराम परब (दोघांचेही वय 30, रा. काळाचौकी मुंबई) बुडाले होते. त्यांचे मृतदेह रविवारी (दि. 21) दुपारी रोहा-कोलाड रस्त्यालगत असलेल्या पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालयाच्या मागील बाजूस कुंडलिका नदीपात्रात आढळले. या घटनेची नोंद रोहे पोलीस ठाण्यात झाली आहे.