Breaking News

टीका करताना इतिहासाचे ज्ञान हवे; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : प्रतिनिधी

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचे सांगून मोदींवर निशाणा साधला. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  टीका-टिप्पणी करताना काहीतरी इतिहासाचे ज्ञान पाहिजे, की अशा व्यक्ती हवाई पाहणीच करतात असा टोला देत प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे कधी नव्हे ते बाहेर पडले, दीड वर्षानंतर बाहेर पडले.. त्यांनी आता इतरांना उपदेश करण्याचं काही कारण नाही. की माझा हवाई प्रवास नाही माझा जमिनीवरून प्रवास आहे. तुमचा जमिनीवर प्रवास व तुमचे पाय जमिनीवर राहणे, याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि याबद्दल खूप खूप आनंद, की तुमचे पाय सरकार आल्यापासून हवेत गेले आहेत, ते जमिनीवर आहेत तर आम्हाला आनंद आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व दरेकरांनी काही हवाई प्रवास केलेला नाही. असे चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. पंतप्रधान हे असे एक पद आहे, की ज्यांच्याबाबतीत धोका पत्कारण अवघड असते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था त्यांना सूचवते की, अधिकाधिक पाहणी करायची असेल, तर तुम्ही हवाई पाहणी करा आणि हीच परंपरा आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीदेखील हेच करत होत्या. त्यामुळे टीका-टिप्पणी करताना काहीतरी इतिहासाचे ज्ञान पाहिजे, की अशा व्यक्ती हवाई पाहणीच करतात. असेही चंद्रकांत पाटील यांनी या वेळी बोलून दाखवले. याचबरोबर, देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर या दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी दुसर्‍याच दिवशी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचा आढावा घेतला. आता त्यांचा प्रवास पूर्ण होत आहे. दोघांनी जमिनीवरून प्रवास केला, हवेतून नाही. त्यांच्या प्रवासानंतर माझा जो प्रवासही तो कोणाला कळणार नाही याचे कारण, ते विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना आढावा घेण्याचे अधिकार आहेत. ते एकूण प्रशासन म्हणून मुख्यमंत्र्याच्या बरोबरीने मानले जातात. माझ्या प्रवासात मी कार्यकर्त्यांना भेटतो, बैठका घेतो. पक्ष म्हणून आपल्याला काय करता येईल, याबाबत माझा समन्वय सुरू आहे. गुजरातला केंद्र सरकारकडून मदत जाहीर करण्यात आल्याने महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीका-टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान मोदी कोणताही दुजाभा करत नाहीत, सगळ्या एकार्थाने वावड्या असतात, सगळ्या अनावश्यक चर्चा असतात. मी मुंबईत असताना तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र प्रवास ठरला, पण हवामान खात्याने त्यांना प्रामुख्याने हवाई प्रवास करताना अजुनही महाराष्ट्रातील सागरी पट्ट्यात ते सोयीचे नाही अशाप्रकारची सूचना केली. म्हणून ते गुजरातला गेले पण गुजरातमध्ये जाऊन, संपूर्ण समुद्र किनार्‍यावरील मृतांच्या नातेवाइकांना दोन लाखांची मदत घोषित केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply