Breaking News

महाराष्ट्रात हा तर तालिबानी कारभार

भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

दहीदंडी पारंपरिक पद्धतीनेसुद्धा साजरी करणार्‍यांवर गुन्हे आणि दडपशाहीचा कारभार करणार्‍या ठाकरे सरकारचा महाराष्ट्रात तालिबानी कारभार सुरू आहे का? अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे.

आज दहीदंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि गर्दी न करता साजरा करण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार राम कदम यांच्यासह उत्सव साजरा करण्यांना मज्जाव करण्यात आला. डोंगरी येथे माझ्या उपस्थितीत जो पारंपरिक उत्सव साजरा होणार होता त्यावर काल रात्रीपासून पोलिसांनी बंदी आणून आयोजकांवर दडपशाहीचा वापर करण्यात आला. कुलाब्यात कोकण विकास आघाडीचे पदाधिकारी कमलाकर दळवी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आज मुंबईत ठिकठिकाणी हेच चित्र होते भाजपच्या कार्यकर्त्यांना अशाच पद्धतीने दडपशाहीचा अनुभव आज आला. आम्ही ठाकरे सरकारच्या या कारभाराचा निषेध करतो. गणेशोत्सव काळातही असाच पोलीस बळाचा वापर केलात, तर आज आम्ही शांततेने कायद्याचा सन्मान केला, पण गणेशोत्सवात अशी दडपशाही सहन करणार नाही. नियम पाळून शांतपणे गणेशोत्सव साजरा करू द्या; अन्यथा आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशाराही अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिला आहे.

दरम्यान, गर्दीची कारणे सांगून उत्सवावर बंदी आणत आहात मग पब, डिस्को, बार कसे सुरू आहेत? जे वाटाघाटी करतात त्यांना परवानगी आणि उत्सवांंवर कायद्याने बंदी? हा कसला कारभार? असा टोलाही आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी प्रसिद्धीपत्रात लगावला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply