Breaking News

चरीत शेतामध्ये वीज कोसळली

रचून ठेवलेल्या भाताच्या भार्‍यांचे जळून नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील चरी येथे बुधवारी (दि. 17) संध्याकाळी अनंत थळे या शेतकर्‍याच्या शेतात वीज कोसळली. त्यामुळे शेतात रचून ठेवलेल्या भाताच्या भार्‍यांना आग लागली. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी, तसेच ग्रामस्थांनी धावपळ करून आग विझवली, मात्र अनेक भारे जळून नुकसान झाले.

मागील 3-4 दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसाने शेतकर्‍यांच्या भातपिकाचे मोठे नुकसान होत आहे. बुधवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. याच सुमारास चरी गावाजवळील शेतामध्ये वीज कोसळली. त्यात भाताचे भारे जळून नुकसान झाले. सुदैवाने या शेतकरी कुटुंबातील सदस्य घटनेपूर्वी काही वेळ आधी शेतावरून घरी परतले होते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply