Breaking News

मनमिळावू व्यक्तिमत्व : संजयआप्पा ढवळे

कोणतीही संस्था, संघटना, पक्ष मजबूत करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते. ज्या ठिकाणी उत्तम नेतृत्व ती संस्था, संघटना, असोशिएशन, राजकीय पक्ष नावारुपाला व भरभराटीला आल्याशिवाय राहत नाही. असेच एक सक्षम नेतृत्व संजयआप्पा द्वारकानाथ  ढवळे यांच्या रुपाने माणगांव तालुक्यात भाजपला लाभले आहे. त्यांचा आज (दि. 21) वाढदिवस त्यांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा… माणगांव तालुक्यातील इंदापूर गांवातील गरीब कुटूंबात 21 जानेवारी 1966  ला जन्मलेल्या संजयआप्पा यांनी आपल्या आयुष्यात कष्ट, जिद्द व दुरदृष्टीच्या जोरावर यशाची शिखरे गाठली. समाजात त्यांनी गोरगरीब जनता केद्रबिंदू मानून काम केले. गरीबांना भेडसावणार्‍या अडीअडचणी, त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आप्पांची नेहमीच धडपड व तळमळ असते. विद्यार्थ्यांना, गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्यात आप्पांनी नेहमीच प्राधान्य दिले. या स्वभावगुणामुळे त्यांनी आज माणगांव तालुक्यात आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. समाजात अनेक श्रीमंत माणसे आपण पहातो. पण   दुसर्‍यांना मदत करण्याची दानत फार थोड्यांमध्ये असते. ती दानत आप्पांच्या अंगी आहे. आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो, या उदात्त भावनेने आप्पा समाजासाठी योगदान देत असतात. हे कार्य करीत असताना आप्पा  भारतीय जनता पार्टीचे गेली अनेक वर्षे निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करीत आहेत. याचे फळ त्यांना भाजपने निश्चितच दिले आहे. 1997 साली कै. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेले आप्पा हे माजी खासदार लोकनेत रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे अत्यंत निकटचे व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. आप्पांनी   विकासकामे मागायची व ती ठाकूर पिता-पुत्रांनी द्यायची  असे समिकरण आहे. सन 2014 मध्ये केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आली आणि पक्षश्रेष्ठींनी आप्पांना माणगाव तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केले. या योजनेच्या माध्यमातून आप्पांनी 2014 ते 2019 दरम्यान अनेक निराधार व्यक्तींना लाभ मिळवून दिला. या कार्यामुळे आजही गोरगरीब जनता आप्पांचे नाव आवर्जून घेताना दिसते. संजयआप्पा ढवळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन तालुका पत्रकार संघाने 2018 साली त्यांना ’सेवाभावी कार्यकर्ता’ पुरस्काराने सन्मानीत केले होते. भाजप जिल्हा कार्यकारीणी सदस्य म्हणून आप्पांनी अनेकवर्षे चांगल्या प्रकारे काम करुन पक्षाला योगदान दिले आहे. त्यामुळे तालुक्यात आप्पा चांगल्या प्रकारे पक्ष संघटना बळकट करु शकतात, असा विश्वास बाळगून पक्षश्रेष्ठींनी आप्पांवर तालुक्याची धुरा सोपविली आहे. तालुकाध्यक्ष पदाची धुरा हातात घेतल्यानंतर दोन-चार दिवसांत आप्पांनी माणगांव तहसील कार्यालयासमोर भाजपचे जनसंपर्क कार्यालय उभारले. त्याचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीत 17 जानेवारी 2018 रोजी झाले होते. आप्पांनी पुरुष व महिला कार्यकर्त्यांना संघटीत करुन त्यांना पक्षाची ध्येय्य धोरणे तसेच केंद्र सरकारी योजनांची माहिती तळागाळातील जनेतपर्यंत पोहचवा, असा सल्ला दिला. पक्ष हितासाठी कामाला लागा, पक्ष तुमच्या कार्याची निश्चित दखल घेईल, असा विश्वास आप्पांनी कार्यकर्त्यांना दिला. ते तरुणांना सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रात प्रोत्साहन देऊन त्यांना नेहमीच मदतीचा हात देत असतात. कोविड 19 मध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे कामधंदे बंद पडले होते. याकाळात आप्पा ढवळे यांनी गोरगरीब जनतेला अन्नधान्यांच्या कीटचे वाटप केले. तसेच कोरोना योद्ध्यांना सॅनिटायझर, मास्क, पीपीई किटचे वाटप केले. कोरोना काळात त्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची चिंता न करता कोरोना योद्ध्याची भूमिका बजावली. या कार्याची दखल घेऊन माणगाव तालुका पत्रकार संघाने त्यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविले. आप्पांना दीर्घायुष्य लाभून त्यांचे सामाजिक, राजकीय कार्य असेच पुढे सुरु रहावे, हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

-सलीम शेख, माणगाव, जि. रायगड

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply