माणगाव ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळील तिलोरे गावच्या हद्दीत भरधाव कंटेनरची धडक बसून दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 15) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील फिर्यादी राजेंद्र गंगाराम राइका हे त्यांच्या ताब्यातील कार चालवित असताना माणगावकडून येणार्या एका कंटेनरच्या (एमएच 46-बीएम 0676) चालकाने माणगाव बाजूकडे जाणार्या मोटरसायकलला (एमएच-02 इजी 1385) आपल्या वाहनाची धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील विशाल संजय सकपाळ (वय 34, रा. दिवा, जि. ठाणे) व राजेश राजाराम धामणकर (वय 30, रा. खार, मुंबई) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन कंटेनरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper