मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात मंगळवार (दि. 22)पासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालवाधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 21) एक बैठक घेतली. या बैठकीत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणार्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणार्या प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …
RamPrahar – The Panvel Daily Paper