मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात मंगळवार (दि. 22)पासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालवाधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 21) एक बैठक घेतली. या बैठकीत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणार्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणार्या प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Check Also
‘स्वर संध्या’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध
पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper