मुंबई ः प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनला 25 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आर्यनच्या जामिनासाठी शाहरूखची मैत्रीण व अभिनेत्री जुही चावला ही जामीनदार म्हणून राहिली आहे. एक लाखांच्या जातमुचलक्यावर आर्यची जामिनावर सुटका झाली.
आर्यनच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने 14 अटी घातल्या आहेत. आर्यन हा पोलिसांना कळवल्याशिवाय मुंबई सोडू शकणार नाही. त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याला त्याचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे.
Check Also
पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‘जीवन गौरव’ प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्तजनसेवेच्या महान यज्ञामध्ये उल्लेखनीय योगदान देत भावी पिढीला प्रेरणा देणारे माजी खासदार, …
RamPrahar – The Panvel Daily Paper