रसायनी : प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील तुपगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वरद अंगण सोसायटीकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाली असून तेथील पथदिवे नादुरुस्त असून काही ठिकाणी पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या भागातील कामासाठी बाहेर जाणार्या नागरिकांची, तसेच वाहनचालकांची गैरसोय होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील तुपगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणार्या वरद अंगण रस्त्यावर ग्रामपंचायतीकडून पथदिवे लावण्यात आले होते, पण बहुतेक पथदिवे निकामी झाले आहेत. या भागात शेकडो लोकांची वस्ती आहे. मागील काही महिन्यांपासून येथील रस्त्यावर बहुतेक पथदिवे बंद आहेत, त्यामुळेच रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनदेखील ते कानाडोळा करीत आहेत, पथदिवे लावण्यासाठी इलेक्ट्रिशन उपलब्ध नाही, असे सांगण्यात येत आहे. पथदिवे बंद असल्याने कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक, विद्यार्थी वर्ग, वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Check Also
उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper