अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेवर सोमवार (दि. 21)पासून प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेची मुदत रविवारी संपुष्टात आली.
विद्यमान जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सलग पाच वर्षे सत्ता राहिली आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे अध्यक्षपद होते, तर उर्वरित अडीच वर्षांसाठी शेकापच्या योगिता पारधी अध्यक्ष होत्या. मावळत्या जिल्हा परिषदेत 59 सदस्य होते. शेकापचे 23, राष्ट्रवादी 12, शिवसेना 18, भाजप व काँग्रेस प्रत्येकी असे पक्षीय बलाबल होते.
Check Also
खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …
RamPrahar – The Panvel Daily Paper