Breaking News

शुक्रवारपासून आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

  •  पनवेलमधील धरणा कॅम्प येथे घुमणार दम
  •  प्रो कबड्डीतील नामवंत खेळाडूंचा समावेश
  •  मान्यवरांची लाभणार उपस्थिती; दर्शकांना पर्वणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने 22 ते 24 एप्रिलपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा धरणा कॅम्प येथे होणार आहे. या स्पर्धेत प्रो कबड्डीतील नामवंत खेळाडूंचा समावेश असणार असून कबड्डीचा थरार क्रीडारसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी 5 वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार आशिष शेलार, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह आस्वाद पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती संजना कदम, प्रमिला पाटील, अरुणा भगत, वृषाली वाघमारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, राम वरदायिनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, तर बक्षीस वितरण समारंभ माजी मंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते 24 एप्रिलला होणार आहे.
या स्पर्धेचा क्रीडारसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शेखर कदम, सचिव प्रशांत कदम, खजिनदार जितेंद्र कदम यांनी केले आहे.
लाखमोलाची बक्षिसे व आमदार चषक
या राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या संघास एक लाख रुपये व आमदार चषक, उपविजेत्या संघास 50 हजार रुपये व आमदार चषक, तर उपांत्य विजयी दोन्ही संघांना प्रत्येकी 25 हजार रुपये व आमदार चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकावीरास मोटरसायकल, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड प्रत्येकी 10 हजार रुपये, तर पहिला व दुसरा दिवस मानकरीला प्रत्येकी पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply