Breaking News

मनमौजी माउंटेनियर्सने पाच दिवसात पाच सुळके सर केले

मोहोपाडा ः प्रतिनिधी

चौक, रसायनी, पनवेल विभागातील मनमौजी माउंटेनियर्सने पाच दिवसात पाच सुळके सर करून गडप्रेमींना अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे माउंटेनियर्स यांच्यात उत्साह वाढला आहे. इर्शाळगड, तेल बैला डावा, तेल बैला उजवा, कल कराई, वजीर सुळका हे पाच कठीण सुळके रसायनीतील विनयप्रताप हनुमंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसात चढून ही मोहीम पार पाडण्यात आली.

यात 10 ट्रेकर्सचा समावेश होता. त्यात विनयप्रताप सिंह, सुजित भगत, हर्षित भावसिर, चेतन फुलमाळी, अक्षय माळी, योगेश थोरात, केतन धोत्रे, अमन मिश्रा, फोटोग्राफर आकाश सहानी आणि गाडी चालक रोहित पाटील या मोहिमेत सामील होते. खालापूर तालुका व पनवेल तालुका यांच्या हद्दीवरील इरशालगड चा सुळका पहिल्या दिवशी सर केला. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील तैल-बैला किल्याचा डावा इनरवॉल सर केला करून तिसर्‍या दिवशी तैल बैलाचा उजवा इनरवॉल सर केला. चौथ्या दिवशी कर्जत तालुक्यातील डाक बहिरी येथील कलकराई चा सुळका सर करून रात्रीचा प्रवास करून ठाणे जिल्ह्यातील शहापुर येथील वाशिंद मधील माहुली किल्यावरील सर्वात घातक मानला जाणारा वजीर सुळका सर करून महाराष्ट्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply