अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.
वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवाmalharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).
- भारताला आपल्या गरजेच्या इतके टक्के इंधनाची आयात करावी लागते?
अ. 100 टक्के आ. 85 टक्के इ. 60 टक्के ई. 50 टक्के
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी फेब्रुवारी 2019 पासून देशातील किती शेतकरी
कुटुंबांना मिळतो आहे?
अ. 12 कोटी आ. 5 कोटी इ. 8 कोटी ई. 10 कोटी
- जगातील सुमारे शंभर देशांना मोटारींची निर्यात करणारी भारतीय कंपनी कोणती?
अ. टाटा मोटर्स आ. बजाज इ. मारुती सुझुकी ई. महिंद्रा अँड महिंद्रा
टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.
…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!
RamPrahar – The Panvel Daily Paper