मेलबर्न : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 23) लढत होणार आहे. चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी मानली जात आहे.
सुपर 12 फेरीसाठी भारत आणि पाकिस्तान संघ थेट पात्र ठरले असून त्यांचा दुसर्या गटात समावेश आहे. यापूर्वी उभय संघ विश्वचषक स्पर्धेत एकूण 13 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात 12 वेळा भारताने बाजी मारली, तर एकदा पाकिस्तान जिंकला आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत हे संघ दोनदा एकमेकांशी भिडले. त्यात त्यांचा प्रत्येकी एक विजय व एक पराभव झाला. त्यामुळे आता टी-20 वर्ल्डकपमध्ये काय होणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Check Also
महाराष्ट्रात प्रथमच ‘स्मार्ट पे किऑस्क’द्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा
पनवेल महापालिकेचा पुढाकार; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकाभिमुख डिजिटल सेवांच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper