Breaking News

विजेचा धक्क्याने तरुणाचा मृत्यू

पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील पाचगणी आदिवासी वाडीतील तरुणाचा पेण शहरातील म्हाडा कॉलनी येथे एका खासगी बांधकामावर पाणी मारताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी, पेण तालुक्यातील पाचगणी डोंगराळ भागात असणारी काही आदिवासी कुटुंबे उदरनिर्वाहासाठी शहराच्या आजूबाजूला झोपड्या बांधून राहत आहेत. अंतोरे फाटा येथेही काही कुटुंबे राहत असून यातील मोलमजुरी करणारा जयराम गोविंद पारधी (वय 20) हा मंगळवार 17 जानेवारी रोजी सकाळी 8: 30 वाजण्याच्या सुमारास शहरातील म्हाडा कॉलनी येथील एका घराच्या बांधकामावर पाणी मारत होता. त्या वेळी त्याला विजेचा धक्का लागला. यावेळी त्याला उपचारासाठी पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्याला डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. याबाबत सख्या गोविंद पारधी यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून पेण पोलिस ठाण्यात गुन्हा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Check Also

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …

Leave a Reply