Breaking News

वीहूर पुलाच्या रस्त्याकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

मुरुड : प्रतिनिधी

मुंबई मुरुड या मुख्य रस्त्याला जोडणारा वीहूर पूल अत्यंत महत्वाचा असताना सुुध्दा केवळ तीनशे   मीटर रस्त्याला कार्पेट टाकण्याचा विसर बांधकाम खात्यास पडल्याने आज असंख्य प्रवासी यांना धूळ व खाच खळग्यातून प्रवास करावा लागत आहे. 2021  च्या मुसळधार पावसामुळे विहूर् पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे वाहून जाऊन येथे मोठ मोठे खड्डे पडले होते. स्थानिक पत्रकार यांनी पाठपुरावा केल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंत काँक्रीटच्या बांधण्यासाठी लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला. निधी प्राप्त होऊन एक वर्ष झाला असताना देखील संबंधित थेकेदार हा काम सुरू करीत नव्हता यावर खूप गदारोळ झाल्यावर ठेकेदाराने हे काम सुरू केले. सध्या वीहूर् पुलाच्या दोन्ही बाजूकडील संरक्षक भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता या संरक्षक लोखंडी पाईप बसवण्याचे काम शिल्लक आहे. मागील दोन वर्षापासून हे काम प्रलंबित राहिल्याने या पुलाच्या आजूबाजूकडील किमान तीनशे मीटरचा परिसर हा खड्डेमय झाला आहे. या पुलाकडील सर्व बाजूने डांबरी कार्पेट मारणे खूप आवश्यक आहे. परंतु  याकडे दुर्लक्ष झाल्याने असंख्य प्रवाशी यांना धूळ व खाच खळग्यातून प्रवास करावा लागत आहे. किमान तीनशे  मीटरचे तरी कार्पेट डांबरीकरण करून असंख्य प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी बांधकाम खात्याकडे होत आहे. मे अखेर पर्यंत कार्पेट न केल्यास पावसाळ्यात या पुलाजवळ मोठ मोठे खड्डे होऊन प्रवासी लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तेव्हा बांधकाम खात्याने लवकरात लवर कार्पेट करावे अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम करणार!

याबाबत मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे उपअभियंता गोरे याना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, विहूर पूल नवीन स्वरूपात बांधण्यात येणार आहे. हे काम पावसाळ्यानंतर सुरु होणार आहे. त्याचवेळी पुलाच्या आजुबाजुकडील सर्व रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार असून कार्पेट सुद्धा करणार आहोत. आता येथे कोणताही खर्च करता येणार नाही.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply