Breaking News

विराट बनला हजारी मनसबदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय कर्णधार विराट कोहली याने विश्वचषक क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ही गवसणी घातली. अशी कामगिरी करणारा तो विश्व क्रिकेटमधील विसावा आणि तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.विराटने 25 डावांत खेळताना 1029 धावा केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 45 सामन्यांमध्ये 44 डावांत खेळताना 2278 धावा केल्या होत्या. सचिनने 1992 ते 2011 या कालावधीत झालेल्या सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळताना सहा शतके आणि 15 अर्धशतके झळकाविली, तर माजी कर्णधार सौरव गांगुली याने 21 विश्वचषक सामन्यांतून खेळताना 1006 धावा केल्यात. गांगुलीने विश्वचषकात चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply