Breaking News

2020पर्यंत घराघरांत शुध्द पाणी

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केली जल जीवन योजनेची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

2020पर्यंत सर्वांना घराघरांत शुध्द पाणी मिळावे यासाठी ‘जल जीवन’ योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 73व्या स्वातंत्र्यदिनी घोषणा केली. यासाठी 3.5 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना  भारतीय संरक्षण दलाला आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) मिळणार आहे, अशीही महत्त्वाची घोषणा मोदींनी केली. या नवीन पदावर नियुक्त केली जाणारी व्यक्ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख म्हणून काम करणार आहे. या निर्णयामुळे लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांमध्ये सामंजस्य वाढेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. 70 वर्षांमध्ये जे झाले नाही ते काम या सरकारने 70 दिवसांत करून दाखवले. केंद्र सरकारने कलम 370 रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला आणि रद्द केले. जनतेने दिलेले काम करण्यासाठी आज सत्तेमध्ये आलो आहोत. स्वातंत्र्यानंतरही या देशासाठी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांना नमन, असेही  पंतप्रधान मोदी म्हणाले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply