Breaking News

जय भवानी मित्र मंडळातर्फे स्वच्छतेचा जागर

अलिबाग ़: प्रतिनिधी

महात्मा गांधी जयंतीनिमित्त अलिबाग गोंधळपाडा येथील जय भवानी मित्र मंडळातर्फे बुधवारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.गोंधळपाडा येथील समाजमंदिर येथे मंडळाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. गोंधळपाडा समाजमंदिर, अंगणवाडी, व्यायामशाळा, गावदेवी मंदिर, शाळा परिसर, मुख्य रस्ते, सार्वजनिक विहिरी आदी भागातील प्लास्टिक व कचरा गोळा करण्यात आला. तो एकत्र करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष मनोज पडियार, उपाध्यक्ष राकेश दर्पे, सतीश पुजारी, नरेश परियार, गणेश गावडे आदींच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत मोठ्या संख्येने सदस्य व ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply