Breaking News

दीपिका, अंकिता यांना ऑलिम्पिकचे तिकीट

बँकॉक : वृत्तसंस्था

भारताच्या दीपिका कुमारी हिने बँकॉकयेथे सुरू असलेल्या 21व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण जिंकले, अंकिता भक्त हिने रौप्यपदकाची कमाई केली. यासह दोघींनीही टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. विशेष म्हणजे स्पर्धेची अंतिम फेरी भारतीय खेळाडूंमध्येच रंगली.

उपखंडातील देशांसाठी ही पात्रता फेरी होती. त्यातून तीन जागांचा कोटा निश्चित होणार होता. राष्ट्रीय तिरंदाजी महासंघावर निलंबनाची तलवार असल्याने भारतीय खेळाडू राष्ट्रीय ध्वजाविना खेळत आहेत. त्यातही अव्वल मानांकित दीपिका आणि सहावी मानांकित अंकिताने शानदार कामगिरी केली.

दीपिकाने मलेशियाची नूर अफीसा अब्दुल हिला 7-2 ने मागे टाकले. याशिवाय तिने इराणची जहरा नेमातीला 6-4, स्थानिक खेळाडू नरीसारा खुनहिरानचायो ला 6-2 असे मागे टाकून उपांत्य फेरीत धडक देत ऑलिम्पिकसाठी स्थान निश्चित केले. यानंतर व्हिएतनामची एन्गुएट डोथिएनवर एकतर्फी लढतीत 6-2 असा विजय नोंदविला.

अंकिताने हाँगकाँगची लाम शुक चिग एटाचा 7-1, व्हिएतनामच्या एन्गुएन फुयोंगचा 6-0 आणि कझाखस्तानच्या अनास्तासिया बानोवा हिचा 6-4 असा पराभव केला. उपांत्य फेरीत अंकिताने भूतानची कर्मावर 6-2 ने विजय मिळवला. अंतिम फेरीत ती दीपिकाकडून 0-6 अशी पराभूत झाली. भारताचा हा दुसरा ऑलिम्पिक कोटा ठरला. याआधी तरुणदीप राय, अतानु दास व प्रवीण जाधव यांनी विश्व चॅम्पियनशिपमधून कोटा मिळविलेला. या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण, तीन रौप्य व चार कांस्यपदके मिळवली. 2020 साली बर्लिन येथे होणार्‍या विश्वचषकातूनही कोटा मिळविण्याचा खेळाडूंचा प्रयत्न असणार आहे. 

माझा भावी पती अतानु दास याला सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची हमी दिली होती. ही स्पर्धा आमच्यासाठी लाभदायी ठरल्यामुळे संघात आनंदाचे वातावरण आहे.

-दीपिका कुमारी

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply