पणजी : वृत्तसंस्था
वेस्ट इंडिजमध्ये चार एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके आणि गेल्या दोन वर्षांत ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये तीन शतके झळकाविणारा अजिंक्य राहणे भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघात नाही, परंतु त्याला विश्वचषक संघात स्थान मिळविण्याचा विश्वास आहे. अजिंक्यने मुश्ताक अली क्रिकेट चषक स्पर्धेदरम्यान इंदूर येथे आपली मते व्यक्त केली.
रहाणे म्हणाला, माझी निवड करणे किंवा न करणे हे निवडकर्त्यांचे काम आहे. जेव्हा कधी मला राष्ट्रीय संघात संधी मिळते, तेव्हा पूर्ण ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करतो. मी पुढचा विचार करतो. मला विश्वास आहे की मी विश्वचषक संघात असेन.
RamPrahar – The Panvel Daily Paper