Breaking News

भाजपने सांभाळले म्हणून ‘ते’ इथवर पोहोचले; भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची शिवसेनेवर जहरी टीका

मुंबई : प्रतिनिधी

भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून ’ते’ इथपर्यंत पोहचले असल्याची जहरी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेत ते बोलत होते. या वेळी सोमय्या यांनी आपल्या भाषणाची सुरवातच शिवसेनेवर टीका करून केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना रात्र-दिवस फक्त कमळचं दिसत आहे. तर आम्हाला तुमचं सरकार पाडण्यासाठी कोणत्याच ऑपरेशन राबवण्याची गरज नाही. कारण तुमचा एक पाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ओढत आहे, तर दुसरा पाय राहुल गांधी ओढतायत. जे सरकार स्वता:च पडणार, त्याच पाप आम्ही का घ्यावा? अशी टीका देखील सोमय्या यांनी शिवसेनेवर केली आहे.

एकीकडे संजय राऊत घोषणा करतात की उद्धव ठाकरे 7 मार्चेला राम मंदिरात जाणार आणि दुसर्‍या बाजूला त्यांच्याचसोबत सत्तेत असलेला त्यांचा जोडीदार समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा म्हणतो की, उद्धव ठाकरे रामंदिरात जाणार असेल तर आम्ही सुद्धा बाबरी मस्जिद बनवू. त्यामुळे हे शिवसेनेला पटणार आहे का ? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात 2014 पासून महाविकास आघाडीची चर्चा सुरु असल्याचे खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी

सांगितले. तर लोकसभा निवडणुकीच्यावेळी शरद पवारांसोबत संपर्कात होतो हे संजय राऊत यांनी कबूल केलं आहे, त्यामुळे विश्वासघात कुणी केला असा प्रश्न ही यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply