Breaking News

देशातील रुग्णांचा आकडा चार हजारांच्या वर

नवी दिल्ली, मुंबई : देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 4067वर पोहोचली आहे. एकूण 109 जणांचा आतापर्यंत मृत्यू आहे. यातील 30 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला असून 693 नवे करोना रुग्ण देशात आढळून आले आहेत, तर 4067 रुग्णांपैकी तबलीघी जमात मरकझशी संबंधित 1445 रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सोमवारी (दि. 6) देण्यात आली. महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या 868वर पोहोचली आहे. सोमवारी एकाच दिवशी 120 रुग्णांची भर पडली. यातील 68 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply